मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. आमचे म्हणणे ऐकले जात नसेल तर आम्ही एक मिनिट बसणार नाही, कामकाज रेटून न्यायचे असेल तर आम्हाला बसवता कशाला?मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी, सुसाईड नोट जिथे असते तिथे चौकशी होतेच, पण मी दाव्याने सांगतो त्यात कुठल्याही भाजप नेत्याचे नाव नाही, जर असती तर त्यांनी ती घोषित केली असती, डेलकरांची आत्महत्या दुर्दैवी, आत्महत्या पूजा चव्हाणची असो की डेलकरांची, चौकशी झालीच पाहिजे. राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. ते स्वत:च निर्णय घेतात. मुख्यमंत्र्यांनी दिलेले सल्ले मंत्री पाळत नाहीत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.संविधानानं जी जबाबदारी टाकलेली आहे ती झटकण्याचे काम सुरु आहे. राज्यपालांनी नियम 6 नुसार अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची सूचना दिली आहे. अजित पवार अविश्वास ठराव आणण्याचे आव्हान का देतात.तुमची नैतिकता जनता ठरवेल, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसनी ठाकरेंवर केला आहे.