सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरच्या हक्काचं उजनीचे पाणी इंदापूरला पळवून नेले या घटनेमुळे सोलापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. पालकमंत्र्यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा भाजपचे माजी मंत्री आणि आमदार आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख तसेच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. मात्र हे इशारे फक्त स्टंटबाजी पुरते आणि बातमी पुरतेच मर्यादित राहिले.
एक मे या महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री दत्तात्रेय भरणे कालच सोलापुरात आले त्यांनी कोरोना बाबत आढावा बैठक घेतली .शिवाय सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात रात्रीचा मुक्काम केला. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन करून सकाळी आठच्या सुमारास पालकमंत्री थेट इंदापूर कडे रवाना झाले. पाय ठेवू देणार नाही अशा वक्तव्यामुळे पालकमंत्री ये-जा करताना कुठे काही घडू नये यासाठी पालकमंत्र्यांसाठी चौका-चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. सोलापूरच पाणी पळवले जाणार नाही असे असा पुनरुच्चार करत महाराष्ट्र दिनी भरणेमामानी राखट देशा… कणखर देशा ..दगडांच्या देशा..प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.. अस म्हणत सोलापूरला जय महाराष्ट्र करत इंदापूर गाठले…!