मोडनिंब : मोडनिंब, अरण, बैरागवाडी , जाधववाडी सह परिसरातील शेतकऱ्यांनी आज मोडनिंबच्या महावितरण कार्यालयासमोर शेतीपंपाची सक्तीची विजबिल वसुली थांबवून विजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर विजपुरवठा सुरळित करण्यात आले असल्याची महावितरण च्या आधिकार्यांनी घोषित केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , मोडनिंब सह परिसरात मागील काही दिवसापासून महावितरण कडून शेतीपंपाची सक्तीची विजबिल वसुली मोहीम सुरु होती.शेतकऱ्यांनी विजबिलाची रक्कम भरली नाही म्हणून त्यांचे कुठलीही पुर्वसुचना न देता विजकनेक्शन बंद करण्यात येत होते त्यामुळे पिकांना व जनावरांना पाणी देणे मुश्कील होऊन बसले होते त्यातच सध्या कोरोनामुळे बाजारपेठेत शेतीमालाला भाव,नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो काकडी ढोबळी रस्त्यावर फेकून दिली होती.
सक्तीची विजबिल वसुली थांबवून शेतीपंपाचा विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीचे निवेदनही देण्यात आले होते तरीही महावितरण ने मोहीम सुरुच ठेवल्याने आज सकाळी १० वाजले पासून शिवाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हलगीनिनाद करत मोडनिंब ब्रिजपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात केली.शेकडो शेतकऱ्यांनी या आंदोलनात पालेभाज्यासह सहभाग नोंदवत आणलेल्या पालेभाज्या महावितरणच्या दारात टाकल्या त्यानंतर तब्बल तीन तास धरणे आंदोलन केले.या आंदोलनाला महावितरण कडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसुन येताच शिवाजी कांबळे सह काही शेतकऱ्यांनी आंगावर पेट्रोल ओतून घेऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.त्यानंतर उपस्थित महावितरण च्या आधिकार्यांनी वरिष्ठांशी संपर्क करुन विजपूरवठा सुरळीत केला.त्यानंतर हे आंदोलन स्थगित केले.
या आंदोलनात मनोज शहा,कुरण गिड्डे,डि.एम.मोरे,नितीन गडधरे,सुभाष रणदिवे,संजीव शिंदे,बालाजी पाटील,आनंद सुर्वे सह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.