केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या रमाई आवास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना बंद केल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही प्रस्ताव घेऊ नयेत असे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिशा कमिटीच्या बैठकीत दिले. याच मुद्द्यावरून दिशा कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे विरुद्ध खासदार ज्योती वाघमारे यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली. केंद्र सरकारला अहिल्यादेवी तसेच रमाई मातेच्या नावावर असलेल्या योजना बंद करून सर्वकाही पंतप्रधान आवास योजनेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. या दोन्ही योजनांचा आणि समाजाचा अपमान आहे अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली. सभागृहात बोलताना खासदार ज्योती वाघमारे यांनी योजना बंद झाली नाही असे वक्तव्य केले. मात्र अधिकाऱ्यांनी सभागृहात पत्रक वाचून दाखवले.ज्यावेळेस ही योजना सुरू होती त्यावेळी किती लाभार्थींना लाभ दिले असा प्रश्न विचारला. योजना बंद झाली असे वक्तव्य प्रणिती शिंदे सभागृहात करत होत्या तर योजना सुरूच आहे आम्ही तुम्हाला इष्टांक देऊ असे खासदार ज्योती वाघमारे सांगत होत्या. एकूणच दोन्ही ताईंची शाब्दिक जुगलबंदी सभागृहात ऐकायला मिळाली मात्र व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई असल्यामुळे हा व्हिडिओ घेता आला नाही.











