येस न्यूज नेटवर्क:-राज्यातील आगामी २०२६-२७ या वर्षाचा ऊस गाळप हंगाम येत्या १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही कारखान्याने गाळप सुरू करू नये, असे सक्त आदेश शासनाने दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यातील उसाची उपलब्धता, परतीचा पाऊस आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांचा आढावा घेण्यात आला. ऊस वेळेत गाळपास आल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करणे सोपे जाईल, हा विचार करून यंदा हंगाम वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हंगाम लवकर सुरू केल्याने जेमतेम तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी पर्यंत ऊस क्षेत्र संपणार आहे. चालू वर्षी अपुऱ्या पावसामुळे उसाची वाढ चांगली झालेली नाही. शिवाय 70 टक्के क्षेत्रावर खोडवा ऊस आहे. ऊसाला वाढीसाठी कमी कालावधी मिळाल्याने एकरी उत्पादन व साखर उतारा या दोन्ही मध्ये घट होणार आहे.











