मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अखेर तयारी दर्शवली आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, राष्ट्रवादीसोबत जाण्यास त्यांनी सक्त विरोध दर्शविला होता. मात्र, आता ते राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास तयार आहेत.
यासंदर्भात अमरावतीमध्ये बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेला वाटतंय की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो महाविकास आघाडीतील पक्षांचा विषय आहे. आम्ही शिवसेनेला म्हटलं आहे की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या, आम्ही त्यांचंही स्वागत करू. राष्ट्रवादीला त्यांनी आणलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू. ज्या दिवशी त्यांचा याबाबतचा निर्णय होईल. त्या दिवशी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा होईल.
दरम्यान, शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेसोबत असलेले रामदास आठवले यांनी भाजपसोबत राहण्यास पसंत दिली. त्याची त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळून बक्षीसीही मिळाली. त्यानंतर सहा-सात महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यामुळे कमकुवत झालेल्या शिवसेनेला राजकीय मित्रांची सध्या गरज आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे यांनी सध्या मित्रांची चाचपणी सुरू केली आहे.
दरम्यान, शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेसोबत असलेले रामदास आठवले यांनी भाजपसोबत राहण्यास पसंत दिली. त्याची त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळून बक्षीसीही मिळाली. त्यानंतर सहा-सात महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडली. त्यामुळे कमकुवत झालेल्या शिवसेनेला राजकीय मित्रांची सध्या गरज आहे. त्यातूनच उद्धव ठाकरे यांनी सध्या मित्रांची चाचपणी सुरू केली आहे.