सोलापूर जिल्ह्यावर पावसाने वक्रदृष्टी केली असली तरीही गेल्या आठवड्यात उजनी धरण झपाट्याने भरू लागल्यामुळे समाधानाचे वातावरण होते. मात्र आज सकाळी नऊची आकडेवारी पाहता दौंड मधून आता अवघा दहा हजार पाचशे क्युसेक एवढा विसर्ग उजनी धरणात मिसळू लागला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी अत्यल्प वाढू लागली आहे. सध्या उजनी धरणातील पाणी पातळी 48% पोहोचले असून 123 टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात 90 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सोलापूरकरांची चिंता आणखीनच वाढली आहे. आणखी पावसाचे दिवस खूप शिल्लक आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या पाण्याची आवश्यकता असल्यामुळे कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये आज आमदारांनी हा मुद्दा लावून धरावा आणि पालकमंत्र्यांकडून शब्द घ्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून झाली आहे. त्यामुळे आजीच्या डीपीडीसीच्या बैठकीत आरोप प्रत्यारोप सोबतच कोणते विकासाचे मुद्दे मंजूर होतील याकडे लक्ष लागले आहे.









