येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. मागील वर्षी म्हणजे 2021 मधे कोरोनामुळे बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. तर त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के लागला होता. तर यावर्षीचा निकाल 94.22 टक्के आहे. म्हणजे मागील वेळेपेक्षा यावर्षी बारावीचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा आहे. याशिवाय यंदा निकालात मुलींनी बाजी मारली. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण – 97.22 टक्के
पुणे – 93.61 टक्के
कोल्हापूर – 95.07 टक्के
अमरावती – 96.34 टक्के
नागपूर – 96.52 टक्के
लातूर – 95. 25 टक्के
मुंबई – 90.91 टक्के
नाशिक – 95.03 टक्के
औरंगाबाद – 94.97 टक्के