सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये ” आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगतसे गुज पांडुरंग || ” या उक्ती प्रमाणे वारी नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, एकनाथ महाराज उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, श्रावण मास, अधिकमास,गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले.
महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले. परंतु पंढरपूर पोट निवडणूक झाली. त्या संबंधी सभा ही मोठ्या प्रमाणात झाल्या, निकाल सुद्धा गर्दीत व विजय उत्सव ही झाला. राजकीय कार्यक्रम चालतात तर वारीला अडचण का आहे. शासन व अधिकारी या विषयाकडे सकारात्मक पाहत नाहीत. मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. शिवाय सध्या रुग्ण संख्या ही खूप कमी होत आहे.आषाढी वारी ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासनारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येणेसाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी. पंढरपूर बाहेरून येणाऱ्या दिंडीला ही नगर प्रदक्षिणा करणेसाठी परवानगी द्यावी.
अन्यथा मंत्रालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिले आहे.
