येस न्युज मराठी नेटवर्क : हल्ली राजकारणात नवी कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड करण्याची काही लोकांना सवय लागली आहे. त्यांच्या असे महारक्तदान शिबीर घेण्याची हिंमत आहे का?; असा सवाल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केला आहे.
ठाण्यात महारक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. सात दिवस हे शिबीर सुरू राहणार आहे. या शिबीराला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा सवाल केला. हल्ली राजकारणात कीड लागली आहे. लांबलांब जीभा काढून बडबड केली जात आहे. असं रक्तदान शिबीर घेण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? तुम्ही आवाहन केलं तर रक्तदानासाठी अशी गर्दी उसळेल का? आम्ही बघत नाही हे रक्त कुणाला जातं. ज्याला आवश्यक आहे त्याला रक्त जात आहे. जीवदान देणारे हे कार्यक्रम कुठे दिसत नाही. कर्तव्य म्हणून शिवसैनिक मोठं काम करत आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.