मोहोळ तालुक्यातील अनगर पंचायत समितीची जाहीर झालेली पहिलीच निवडणूक उज्वला थिटे यांच्यामुळे प्रचंड गाजली. राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या 65 वर्षात या गावात निवडणूक झाली नाही. त्यांची दहशत म्हणा की त्यांचा होल्ड म्हणा यामुळे 17 नगरसेवक देखील बिनविरोध निवड झाले. मात्र त्यांच्याच विरोधात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी चांगलेच रान उठवले होते. त्यातच उज्वला थिटे या महिलेची भर पडली. मला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही एवढी या ठिकाणी दादागिरी असून बिहार पेक्षा वाईट परिस्थिती आहे असा त्यांनी आरोप केला होता. ही स्टंटबाजी सर्व मीडियावर व्हायरल होताच जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी तिला तब्बल 60 जणांचा पोलीस बंदोबस्त देऊन तसेच काही कागदपत्रे काढण्यास मदत करून अर्ज भरायला लावला. उज्वला थिटे यांच्या अर्जावर सुचकाची सही नसल्यामुळे अर्ज बाद झाला. त्यांनी भरलेल्या अर्जावरती मतदार यादीत नाव असलेला स्वतःचा क्रमांक तसेच प्रभाग क्रमांक चुकीचा टाकणे .. सुचकाची सही न घेणे.. अशा गंभीर चुका कशा केल्या हा प्रश्न आहे. त्यामुळे उज्वला थिटे तसेच उमेश पाटील यांनी ही स्टंटबाजी केली असाच आरोप होऊ लागला आहे.

