आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे ८ जुलै २०२६ रोजी आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरातून दुपारी ३ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले.आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पहाटे सहा वाजता आळंदीहून पुणे मुक्कामासाठी मार्गस्थ झाली असून जुन्या मुंबई पुणे रस्त्याने वाकडेवाडी शिवाजीनगर मार्गे पुण्यात दाखल होणार आहे. यासाठी पुणेकर तसेच प्रशासन सज्ज झाले आहेत, गुगल फॉर्म द्वारे मदतीसाठी पुण्यातील स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे.
तुकाराम महाराजांची पालखी देखील पुण्यात दाखल झाली आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि नाना पेठ येथील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांची निवासाची व भोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीत बदल करून निर्बंध लागू केले आहेत. तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी 101 महापालिकेच्या शाळांमध्ये सोय केली असून ,एकूण आठ हजार पाचशे पोलिसांचा बंदोबस्त ,226 कॅमेरा द्वारे नजर, 200 पाण्याचे टँकर, 133 वैद्यकीय अधिकारी, 176 रुग्णवाहिका , पोलीस मदत केंद्रे याबरोबरच ठीक ठिकाणी पालखी मार्गावर स्वागत कक्ष उभारण्याचे काम हे भर पावसात सुरू होते..











