गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्यास तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यापुर्वी ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती, आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे.
योजनेतील नवीन व प्रमुख बदल:-
कौटुंबिक व्याप्तीचा विस्तार: यापूर्वी ही योजना कुटुंबातील केवळ दोनच सदस्यांना लागू होती; आता ती शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू करण्यात आली आहे.
नवीन घटकांचा समावेश: पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा यामध्ये नव्याने समावेश झाला आहे.
घटकांचा व आपत्तींचा समावेश: अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्राव आणि उष्माघात (Heatstroke) यांचाही अपघाती कारणांमध्ये समावेश करण्यास मान्यता दिली आहे.
आर्थिक तरतूद व मदत: अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास १ लाख ते २ लाखांपर्यंतची आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे दिली जाते, ज्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
प्रक्रिया सुलभता: अर्ज स्वीकारण्याची मुदत दोन महिने असून, जलद व पारदर्शक प्रक्रिया व्हावी यासाठी नवीन ऑनलाइन पोर्टलची व्यवस्था केली जात आहे.
आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण (डिबिटी ट्रान्सफर) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. त्यासाठी इंटिग्रेटेड ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.










