पावसाळ्यामध्ये कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी उजनी धरणात आणण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. पुणे पाटबंधारे प्रकल्प विभागाच्या वतीने या कामासाठी चार प्रकारच्या निविदा काढण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्वेक्षण अन्वेक्शन करून 29 किलोमीटर लांब होणाऱ्या कामाबाबत अंदाजपत्रकासह डीपीआर करण्याबाबत दोन कोटी 58 लाखाची निविदा काढण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्ह्यात दोन वरील प्रकारची कामे करण्यासाठी तीन कोटी 95 लाख आणि चार कोटी 53 लाखाच्या दोन निविदा काढण्यात आले आहेत तसेच सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, सांगली,धाराशिव या दुष्काळी जिल्ह्याला हे कृष्णा नदीचे पाणी देण्यासंदर्भात सविस्तर पाच कोटी 73 लाखाची देखील निविदा करण्यात आली आहे. म्हणजेच कृष्णा नदीचे पाणी उजनी धरणात आणण्यासाठी सुमारे 17 कोटी रुपये खर्चून सध्या प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी टेंडर मागवण्यात आले असून सात सप्टेंबर रोजी हे टेंडर उघडले जाणार आहे.
केंद्र सरकारने सोलापूर जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानक अमृत योजनेतून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून सोलापूर रेल्वे विभागाने अमृत स्टेशन योजनेअंतर्गत पंढरपूर,लातूर, वाडी, अक्कलकोट, कुर्डूवाडी आदि विविध ठिकाणी काम करण्यासाठी तब्बल एकशे 41 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हे दोन्ही सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी प्रकल्प ठरणार आहे.






