पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांतील सामाजिक वनीकरण विभागात 33 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या नावाखाली कोट्यावधीचा घोटाळा उघड झाला आहे याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात तीन अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये एक कोटी 25 लाखांचा घोटाळा झाल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये होता.वृक्षलागवड न करता कागदोपत्री लागवड तसेच बोगस मजूर दाखवून शासकीय निधी लाटल्याचेही आरोप याचिका कर्ते दादासाहेब चव्हाण यांनी केला आहे..त्यानंतर प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली. तब्बल १०९ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप समोर आले.या प्रकरणाची मागणी विधानसभेतही करण्यात आली होती.पोलिस तपासातील विलंबानंतर आता सीबीआय तपास सुरू होणार आहे. खरोखर किती वृक्ष लागवड झाली?किती काम कागदावर दाखवण्यात आले?निधी नेमका कुठे खर्च झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता सीबीआयच्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे. सोलापूर दौऱ्यावर आलेल्या आमदारांच्या अंदाज समिती समोर देखील हा विषय चर्चेला आला होता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील हे प्रकरण सीबीआय कडे वर्ग झाले आहे.






