इराण आणि अमेरिका युद्धात भारताला फटका बसला आहे. 18 व 19 एप्रिल रोजी होमुर्झ खाडीत भारतीय जहाजांवर गोळीबार झाला. या गोळीबारानंतर जहाजं पून्हा बंदराकडे परतले. मात्र, भारतीय जहाजावर झालेल्या गोळीबारानंतर भारताने मोठा इशारा इराणला दिला.
होमुर्झ खाडीत भारताचे अजूनही 14 जहाज अडकले आहेत. होमुर्झ खाडीत दिवसेंदिवस स्थिती बिघडताना दिसत आहे. होमुर्झ मध्ये 14 जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता भारताकडून खास प्लॅन तयार करण्यात आला. होमुर्झ खाडीत जहाज ठेवणे म्हणजे मोठा धोका सध्याच्या परिस्थितीला आहे. इराणकडून होमुर्झ खाडी पूर्णपणे बंद करण्यात आली, त्यामुळे जहाज तिथून काढणे कठीण आहे. हैराण करणारे म्हणजे भारतीय झेंडा असलेल्या जहाजावर इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स सैनिकांनी गोळीबार केला.या घटनेला सरकारने खूप गंभीरपणे घेतले आहे . भारताने या घटनेनंतर भारतामधील इराणच्या राजदूतांना संपर्क साधून याच्यावर टीका केली. होर्मुज खाडीत अडकलेली 14 जहाजं सुरक्षित काढण्याकरिता भारताने प्रयत्न वाढवले आहेत. दुसरीकडे नाैसेनेच्या 7 युद्धनाैकांचे एस्कॉर्टही सुरू करण्यात आले. सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली 14 जहाज सुरक्षित आणायची आहेत.
