येस न्युज मराठी नेटवर्क : आषाढी वारी ही महाराष्ट्राचा संस्कृतिक ठेवा असून ऐतिहासिक वारसा जपणारी परंपरा आहे. या आषाढी वारीला वारकरी भाविकांनी पंढरपूरला जाण्यासाठी प्रवासातील व्यवस्था करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण सध्या सरकार अस्थिर असलेने प्रशासन – अधिकारी सुध्दा आळशी झाले आहेत असे , वारी करताना दिसून येत आहे. आळंदी ते पुणे , सासवड ते जेजुरी- वाल्हे पोलीस काम करत होते का असा प्रश्न पडला होता. सुलभ शौचलय खूप कमी होते व स्वच्छ नव्हते. दोन वर्षा नंतर ही वारी होत असल्याने गर्दी खूप वाढली आहे. याचा विचार करायला हवा होता. प्रशासना कडून पूर्ण दुर्लक्ष केले आहे असे वाटते. अजून ही वेळ गेली नाही. कृपया या वारी मध्ये असलेल्या वारकरी भाविकांनी आनंदात पंढरपूरला जायची व्यवस्था करण्यात यावी. पिण्याचे पाणी , मार्गावरील स्वच्छ्ता, सक्षम वाहतूक व्यवस्था, अशा इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन सुधाकर महाराज इंगळे सोलापूर यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून मुख्यमंत्री कार्यालय येथे ईमेलद्वारे पाठवले आहे.