सोलापूर:जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे ह भ प सुधाकर महाराज इंगळे, डॉक्टर सौ. राधिकाताई चिलका यांच्या हस्ते तसेच पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा शोभा कुलकर्णी इस्माईल बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान श्री विठ्ठल व रुक्मिणी माता , संत ज्ञानेश्वर महाराज व संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर विठ्ठलाची आरती, हरिपाठ, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी एका प्रवेशद्वारा तून संत ज्ञानेश्वर व एका प्रवेशद्वारा तून संत गजानन महाराज यांचे पालखी घेऊन पंढरपूर या ठिकाणी जसे पालख्या व आपली वारी घेऊन येतात त्या पद्धतीनी वारीचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी सहशिक्षिका सुरेखा काळे व सायरा मोगल यांनी पंढरीच्या वारीचे महत्त्व विशद केले.यानंतर पालखी सह व अश्वसह शाळेतील विद्यार्थ्यांनि वारकरी पोशाख परिधान करून जो नयन रम्य असा रिंगण सोहळा करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, या वेळी इयत्ता 5 वी ते 7वी तील विद्यार्थ्यांनी गजर हरिनिनामाचा गजर…. झेंडा रोविला…. झेंडा रोविला या भक्ती गीतावर बहारदार नृत्य सादर केले.
या वेळी प्रमुख पाहुणे अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष .ह.भ. प .सुधाकर महाराज इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ. प सुधाकर महाराज इंगळे यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपणास संस्कार जर मिळवायचे असतील आपण कुठे जावे, याचे उत्तर म्हणजे पंढरीची वारी, पिढ्यान् पिढ्या या वारीला सांभाळणारी ही संत मंडळी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, महाराज यांनी वारी टिकवण्याचे प्रयत्न केले आहेत.तसेच प्रवाहा सोबत शिक्षण घेणं योग्य आहे, परंतु संस्कृतीला स्वीकारून शिक्षणाची जोड असली पाहिजे, आपली संस्कृती ही आपल्याला दिशा देणारी आहे, आपली संस्कृती ही जीवन घडवणारी आहे, आणि म्हणुन जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी बाल मनावर संस्कृतीचे, वारीचे संस्कार व्हावे या विचाराने शाळेने हा कार्यक्रम घेतला त्या बद्दल शाळेचे कौतुक केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष माननीय डॉ. सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष आमदार देवेंद्र दादा कोठे, सचिव प्रथमेश दादा कोठे, राधिका चिलका शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






















