सोलापूर शहरातील भाजपचे राजकारण हे व्यक्ती केंद्रित झाले होते मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याला छेद देऊन बाहेरील ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येत नाहीत अशा प्रभागात ताकतवान उमेदवारांना भाजपमध्ये घेतले. गणेश वानकर, किसन जाधव, कुमार माने, नागेश ताकमोगे, प्रथमेश कोठे, नाना काळे या आदींना पक्षात घेतले. एवढेच नव्हे तर त्यांना देऊन बळ दिले. यामुळे सहाजिकच आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख दुखावले होते. यामध्ये भाजपच गटबाजी उघडपणे नाराजी सुरू झाली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या मास्टर स्ट्रोक मुळे आता भाजपमधील गटबाजी बहुतांश दूर झाली आहे. देगाव मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नारळ फोडला. यावेळी आमदार यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे सर्वजण एकत्र आले होते. आमच्या निष्ठावान उमेदवारांना तिकीट नाही दिले तर त्यांना उभे करून त्यांचाच प्रचार करू अशी भावना दोनही आमदार देशमुखांनी व्यक्त केली होती. कितीही विरोध केला तरीही पालकमंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिल्यामुळे आता दोन्ही आमदारांनी गटबाजी सोडली आहे. आता प्रचारात रंगत येऊ लागली असून गटबाजी संपवून पालकमंत्र्यांनी एकीचे दर्शन दाखविले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांमुळेच सोलापुरात विमानसेवा सुरू झाली. आयटी पार्क मंजूर झाले. सोलापूरच्या प्रत्येक बाबींकडे त्यांचे बारकाईने निरीक्षण असल्याचा सूचक इशारा देखील दिला.

