मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले.लोणावळ्यात सर्वाधिक 900 मिमी इतक प्रचंड पाऊस झाला. गेल्या 16 वर्षातील विक्रमी पावसाची नोंद लोणावळ्यात झाली आहे .पिंपरी चिंचवड मध्ये 326 मिलिमीटर आणि पुणे शहरात 233.6 मिलिमीटर पाऊस झाला . जुलै च्या इतिहासात पडलेल्या पावसाचा हा चौथा ऐतिहासिक उच्चांक आहे.या मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावरून शहरापर्यंत सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले तर दरडी कोसळण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. 22 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना,83 ठिकाणी झाडे कोसळली तर नऊ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले , 270 हुन अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये तसेच सखल भागात पाणी शिरून भाग जलमय झाला. अग्निक्षमन व क्षेत्रीय कार्यालयांकडे 34 तक्रारी दाखल झाल्या असून , महापालिकेचे 4000 सफाई कर्मचारी ,50 आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता पर्यवेक्षक सज्ज असून विशेष कार्य प्रणाली राबवण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. भीमा खोऱ्यात तसेच घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात आज सकाळच्या नोंदीनुसार एक लाख पंचेचाळीस हजार एवढ्या प्रचंड वेगाने पाणी येऊ लागले आहे त्यामुळे मायनस 20% असलेले धरण आज रात्रीपर्यंत प्लस मध्ये येईल. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मात्र पावसाचा अद्याप पत्ता नाही.. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यावर संकट निर्माण झाले आहे.









