येस न्युज नेटवर्क : अमरावतीचे बंटी-बबली मुंबईत आले होते. त्यांना शिवसेनेने पळवून लावले. आम्हाला धमक्या देऊ नका. अन्यथा २० फूट खाली गाडले जाल, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिला.
आज दुपारी आमदार रवी राणा यांनी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यात विघ्न नको म्हणून ‘मातोश्री’ समोरील हनुमान चालिसा पठण आंदोलन मागे घेत आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा करत एकच जल्लोष केला. तसेच पेढे आणि साखर वाटण्यात आली.
राणा दांपत्याने मुंबईतील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, अमरावतीचे बंटी-बबली मुंबईत आले होते. त्यांना शिवसेनेने पळवून लावले. आम्हा धमक्या देऊ नका. अन्यथा २० फूट खाली गाडले जाल. आम्हाला हिंदुत्व काेणीही शिकवू नये. भाजपकडून अत्यंत हिन पातळीचे राजकारण सुरु आहे, असा आराेपही त्यांनी केला.