नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यामधील 92 नगरपरिषदांची निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. याला महाविकास आघाडीसह भाजपचाही विरोध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमधील पत्रकार परिषदेत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, ‘ओबीसी आरक्षणासहितच निवडणूक व्हावी ही सरकारची भूमिका आहे. पावसाळ्यात निवडणूक घेण्यात अडचणी येतात, निवडणूक पुढे ढकलण्याबाबत विचार आहे. 92 नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्याबाबत आयोगाशी चर्चा करू. निवडणूक ओबीसी आरक्षासहितच व्हावी, ही आमचाही इच्छा आहे. त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत.’ ओबीसी आरक्षणाबाबत तुषार मेहता यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. ओबीसी आरक्षणाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.