राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत ३१ जुलैवरून आता थेट १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. एल निनोमुळे हवामानातील संभाव्य बदल लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.प्रधानमंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट आणि हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देते. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
ऑनलाइन अर्जासाठी: शेतकरी PMFBY Crop Insurance App डाउनलोड करू शकतात किंवा www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. (Pradhan Mantri pik vima yojana)











