मुंबई : ही आव्हानं द्यायची वेळ नाही, भास्कर जाधव यांचा संजय राऊत यांना टोला. आव्हान द्यायला पाहिजे, पण सध्याची परिस्थिती पाहता हे आव्हान द्यायची नाही, तर संवादाची वेळ आहे. आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे. मी तेव्हाही सांगितलं होतं की आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका? शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले व आपल्या कोट्यातील तीन मंत्रीपद अपक्ष आमदारांना का दिली? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला आहे.