भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने भारताचे संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि आर एस एस व भाजपच्या लोकांनी षडयंत्रपूर्वक बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा च्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ रॅली. बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा यांचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 26 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 20225 दरम्यान ओडिशातील कटक येथे आयोजित केले जाणार होते. जे स्पष्टपणे ओबीसीच्या जाती आधारित जनगणनेसाठी समर्पित होते. हे अधिवेशन आयोजित करण्यासाठी संघटनेने जिल्हाधिकारी कटक महानगर पोलीस प्रशासन आणि इतर सर्व विभागांकडून पूर्वपरवानगी आणि आवश्यक परवानगी दोन महिने आधीच पूर्ण केल्या होत्या. या अधिवेशनाला देशभरातील आणि परदेशातील बामसेफ आणि त्याच्या संलग्न संघटनांचे तसेच भारत मुक्ती मोर्चा आणि त्याच्या संलग्न संघटनांचे हजारो अधिकारी कार्यकर्ते आणि समाज उपस्थित राहणार होते. अधिवेशनाची परवानगी प्रशासनाने आठ-दहा दिवस आधी संघटनेला दिले होती. परंतु अधिवेशनाच्या अगोदर दिनांक 24 डिसेंबर रोजी आरएसएस आणि भाजपची संबंधित व्यक्तींच्या दबावामुळे आणि षड्यंत्रामुळे महानगर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी जाणून बुजून आणि अचानकपणे राष्ट्रीय अधिवेशनाची प्रशासकीय परवानगी रद्द केली याविरुद्ध संघटनेने उच्च न्यायालयात अपील केले परंतु उच्च न्यायालयाने ही आमच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी वेळेवर कारवाई केली नाही. ही कृती भारतीय संविधानाच्या कलम 19 (1) अ अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 19 1 ब शांततापूर्ण सभा घेण्याचे स्वातंत्र्य, कलम 19 (1) क संघटना स्थापन करण्याचा अधिकार कलम 14 समानतेचा अधिकार या कलमांचे उल्लंघन आहे. रॅलीचा उद्देश संविधानिक अधिकाराविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या आणि अधिवेशन थांबविणाऱ्या आरएसएस बीजेपीच्या संविधान द्रोही राजकारणाच्या विरोधात. मोर्चा कशासाठी –
- बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा च्या राष्ट्रीय अधिवेशनाची परवानगी तात्काळ पुनर संचित करावी.
- या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधी कार्यकर्त्यांना आणि संघटनेला झालेल्या खर्चाची आणि नुकसानीची पूर्णपणे भरपाई करावी.

