राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्रे तसेच हमीपत्र जोडणे निवडणूक आयोगाने बंधनकार केले आहे. 2001 नंतर दोन पेक्षा जास्त अपत्ये नाहीत.. तसेच महापालिका टॅक्स थकीत नाही कोणताही गाळा महापालिकेकडून घेतला नाही तसेच मी ठेकेदार नाही अशी हमीपत्रे उमेदवारी अर्जा सोबत जोडून द्यावा लागणार आहे. उमेदवारांनी बेकायदेशीर बांधकाम केले तर त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. त्यामुळे आपापल्या प्रभागात इच्छुक असलेल्या विरोधकांची सर्व पाळेमुळे काढण्यासाठी- हरकती घेण्यासाठी अनेक कार्यकर्ते चांगलेच सरसावले आहेत. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांना डोळ्यात तेल घालून माहिती भरावी लागणार आहे.

