पंढरपुरात सुमारे साडेचार हजार कोटी रुपये खर्च करून कॉरिडॉर उभारण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली असून यासाठी भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अडीच वर्षात हा पंढरपूरचा कॉरिडॉर पूर्ण होईल असे सांगितले आहे. त्याचप्रमाणे आता अक्कलकोटला देखील सातशे कोटी रुपये खर्च करून स्वामी समर्थांच्या दर्शन रांगेसाठी कॉरिडॉर उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हे काम करण्याच्या सूचना दिले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे या कामासाठी आग्रही होते.









