गुरुवारी दिवसभर उखाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना रात्री अकराच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडात ऐकून जणू काही पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की काय असा भास सोलापूरकरांना झाला.काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस झाला. अशा वातावरणात जवळपास दोन तास विविध भागातील वीज बंद असल्यामुळे नागरिक हैराण झाले. या वादळी वाऱ्या सह झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील विविध फळबागांचे मोठे नुकसान झाले.

