मुंबई : इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी ट्वेन्टी सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने कर्णधारपदाच्या भूमिकेत असताना चमकला. त्याने केवळ चार ओव्हर्ससाठी कर्णधापद स्वीकारलं. पण याच चार ओव्हर्समध्ये त्याने इंग्लंडच्या गोटात गेलेला विजय परत भारताकडे खेचून आणला. सोशल मीडियावर आता रोहित शर्माच्या कॅप्टन्सीचं कौतुक होत आहे तसंच टी ट्वेन्टीचं कर्णधारपद रोहित शर्माकडे द्या, अशी मागणीही होत आहे.
रोहितच्या केवळ चार ओव्हर्सच्या कॅप्टन्सीपुढे इंग्लंडने गुडघे टेकले
रोहितच्या केवळ चार ओव्हर्सच्या कॅप्टन्सीपुढे इंग्लंडने गुडघे टेकल्याचं पाहायला मिळालं. 16 व्या ओव्हरमध्ये कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यामुळे रोहित शर्माला कॅप्टन्सी करावी लागली. ज्यावेळी रोहितकडे कॅप्टन्सी आली तो काळ संघासाठी अतिशय कठीण होता. पण याच दरम्यान रोहितने ज्या प्रकारे कॅप्टन्सी केली ती क्रिकेट रसिकांना फारच आवडली.