सोलापूर : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम वेळेवर न दिल्याप्रकरणी आरआरसी ॲक्टनुसार सोलापूर जिल्ह्यातील सात साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्या-त्या तालुक्यातील तहसीलदारांना दिले आहेत. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल साखर कारखान्याकडे 39 कोटी, अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ माऊली शुगर कडे 21 कोटी रुपये, उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धनाथ शुगर यांच्याकडे 72 कोटी रुपये, माढा तालुक्यातील विठ्ठल रिफायनरी यांच्याकडे 60 कोटी रुपये, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जयहिंद शुगर यांच्याकडे 61 कोटी रुपये ,उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील लोकमंगल शुगर यांच्याकडे 31 कोटी रुपये तर भंडारकवठे येथील लोकमंगल शुगर इथेनॉल यांच्याकडे 77 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम थकली आहे.