येस न्युज नेटवर्क : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काेट्यवधी रुपयांचा घोटाळे केल्याचा आराेप भाजप नेते किरीट सोमय्या करत आहेत. दुसरीकडे मनसे राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून शासनाला भोंगे उतरविण्यासाठी ३ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटच दिला आहे. तिसरीकडे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचे आव्हान देऊन गोंधळ सुरू केला आहे. (राष्ट्रपती राजवट)
अशा परिस्थितीत किरीट सोमय्यांच्या वाहनावर झालेला हल्ला, विविध प्रकरणांवरुन शिवसेना व भाजपाचे कार्यकर्ते सातत्याने आमने-सामने येणे . माताेश्रीसमाेर हनुमान चालिसा पठणाच्या आव्हान देणार्या राणा दाम्पत्याला झालेली अटक .. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘कायदा व सुवस्थे’चा प्रश्न निर्माण झाल्याचा आराेप विराेधी पक्षांच्या नेत्यांकडून हाेत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, “सामान्य जनतेची इच्छा आहे की, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट लावावी.