येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय संघातील खेळाडू काही दिवसांपूर्वीच चेन्नई येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दाखल झाले होते.
भारतीय खेळाडूंची यावेळी करोना चाचणी करण्यात आली होती आणि त्यांना सहा दिवस क्वारंटाइन ठेवण्यात आले होते.भारतीय खेळाडूंचा क्वारंटाइनचा कालावधी आता संपला असून त्यांनी सरावाला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर खेळाडूंचे सराव करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत आणि याबाबतची माहिती दिली आहे.