“ हर घर तिरंगा”साठी ५ लाख तिरंगा झेडेंचे नियोजन
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रमा साठी पाच लाख झेंडे पुरविणे बाबत नियोजन सुरू आहे. गृहभेटी देऊन दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घर व शासकीय कार्यालयावर 4 लाख तिरंगा झेंडा उभारणे साठी नियोजन केले आहे. भारताचा अमृत महोत्सवा निमित्त गुणवत्ता वाढी साठी प्रयत्न करा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. पंढरपूर स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांतील प्राथमिक शाळा मधील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांची कार्यशाळेत मार्ग दर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक डाॅ. किरण लोहार, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) भास्कर बाबर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, सुहास गुरव, हरीश राऊत, अतहर दफेदार, ग्यान प्रकाश फाऊंडेशन चे संभाजी रोडे, प्राचार्च डाॅ. रामचंद्र कोरडे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, मंगळवेढा चे गटशिक्षणाधिरी बजरंग पांढरे उपस्थित होते.
शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा – सिईओ स्वामी
पालक मेळावा घेऊन त्यांना दशसुत्री समजावून सांगा. मुले आहेत तर शाळा आहे. शाळा आहे तुम्ही आहात असा सल्ला शिक्षकांना दिला. पटसंख्या वाढली म्हणजे पगार वाढली का? मुले शाळेतून काढली शिक्षकांचे काय अस्तित्व आहे. याचा विचार करा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. पटसंख्या वाढविण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो.
40 लाख लोकसंख्या असेलेले जिल्ह्सात फक्त ४३ मुले शाळा बाह्य आहेत याबाबत विचार करणे सारखी गोष्ट आहे. शोध घ्या. शाळे पासून वंचित मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.
सिईओंनी दिले हात धुणेचे प्रात्यक्षिके ..!
शिक्षणाची दशसुत्री या कार्यक्रमा मघ्ये आरोग्य व स्वच्छतेचे महत्व समजावून सांगताना त्यांनी हात धुणेचे प्रात्यक्षिके करून दाखविली. कोरोनाने डोळे उघडले नंतर आपण स्वच्छतेकडे वळलो असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगून हात धुण्याचे प्रात्यक्षिके करून त्यांनी उपस्थित मुख्याध्यापक यांना प्रबोधन करून विद्यार्थाच्या आरोग्याची व स्वच्छतेची काळजी घेणेचे आवाहन केले.
हर घर तिरंगा”साठी4 लाख तिरंगा झेडेंचे नियोजन
सोलापूर जिल्ह्सात दि.13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमा साठी पाच लाख झेंडे पुरविणे बाबत नियोजन सुरू आहे. गृहभेटी देऊन दि. दि.11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घर व शासकीय कार्यालयावर ५ लाख तिरंगा झेंडा उभारणे साठी नियोजन केले आहे.