#yesnewsmarathi#bhusarvypari#GST
सोलापूर : सध्या ई-कॉमर्स कंपन्या आणि ऑनलाईन बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे व्यापार कमी होत चालला आहे . असे असताना देखील केंद्र सरकारने अन्नधान्य, गहू, तांदूळ, डाळी, गूळ व इतर खाद्याने वस्तूवर ५% जीएसटी लागू केली आहे या कायद्याच्या प्रखर विरोधात भारतीय उद्योग व्यापार मंडळ नवी दिल्ली, पुणे मर्चंट चेंबर, कॅमेट, फाम या वरिष्ठ शिखर संघटनेच्या आदेशानुसार दिनांक १६ जुलै रोजी भाजीपाला मार्केट वगळता सोलापूर मार्केट यार्डातील भूसार विभाग व शहरातील किराणा मार्केट हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश चिक्कळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या ई-कॉमर्स कंपन्या आणि ऑनलाईन बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे व्यापार कमी होत चालला आहे पारंपरिक व्यापार्याला मोठ्या स्पर्धेत तोंड द्यावे लागत आहे त्याला सरकारने मदत करणे अपेक्षित असताना सरकार सर्व खाद्यान्न वस्तूवर जीएसटी लावून पारंपरिक व्यापार संपवत आहे का ? हा निर्णय बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने घेतला जात आहे का ? असे अनेक प्रश्न व्यापारी वर्गाला पडले आहे.