• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मुंबईतील नेस्को मैदानावरील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक

by Yes News Marathi
October 19, 2025
in इतर घडामोडी
0
मुंबईतील नेस्को मैदानावरील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्रात 96 लाख खोटे मतदार भरले:निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालंय; राज ठाकरे

मुंबई – नेस्को मैदानावरील मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सर्व मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ‘ग्रँड मेळाव्या’साठी उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत 8 ते 10 लाख, ठाण्यात 8 लाख, असेच प्रत्येक जिल्ह्यात बोगस मतदार आहेत. 1 जुलै रोजी त्यांनी यादी बंद करून टाकली आणि त्यात हा गोंधळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. अशाप्रकारे निवडणुका होत असतील, तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.

निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’

राज ठाकरे म्हणाले की, मॅच फिक्सिंग झालेले आहे, तुम्ही मतदान द्या किंवा नको. मग सांगतात की, यांचा एक आमदार निवडून आला नाही, एक खासदार निवडून आला नाही. अरे कसा येणार, तुम्ही अगोदरच फ़िक्स करून ठेवले आहे, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.

विधानसभेच्या निकालानंतरचा ‘सन्नाटा’

राज ठाकरे म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतके मोठे आमदार निवडून आल्यानंतरही राज्यात सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका नव्हत्या, जल्लोष नव्हता. मतदार अवाक झाले होते, तर निवडून आलेलेही अवाक झाले होते. निवडून आलेल्यांनाही मी कसा निवडून आलो हे समजले नाही. यामुळे लोकांना कळाले की, देशात निवडणुका कशा झाल्या आहेत.

निवडणूक आयोग ‘सत्ताधाऱ्यांचा गुलाम’?

राज ठाकरे म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला बोलत आहोत तर सत्ताधाऱ्यांना राग येतोय, कारण त्यांनी शेण खाल्ले आहे. निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांचा गुलाम नाही. मतदान यादी स्वच्छ होत नाही तो पर्यंत निवडणूका होऊच नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

भुमरेंच्या वक्तव्याचा दिला दाखला

राज ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे बेधडक बोलणे कसे सुरू आहे, हे स्पष्ट करताना त्यांनी एका आमदाराचे (विलास भुमरे यांचे) उदाहरण दिले. भुमरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते की, त्यांनी बाहेरून 20 हजार मतदान आणले. बेधडक सत्ताधारी पक्षातील आमदार तुमच्या नाकावर टिच्चून बोलत आहात.

Previous Post

मतदार याद्यांमधील त्रुटींवर सर्वपक्षीय विरोधकांचा एल्गार: निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चा, संजय राऊतांची घोषणा

Next Post

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध : पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध : पालकमंत्री जयकुमार गोरे

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध : पालकमंत्री जयकुमार गोरे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In