नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन दोन दिवस आधीच गंडाळण्यात आले . तसेच लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधकांच्या गदारोळावरून केंद्र सरकारने विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांनी जनतेचे कुठले मुद्दे संसदे मांडले. विरोधकांचा संसद ते रस्त्यापर्यंत एकमेव अजेंडा हा फक्त अराजकता निर्माण करण्याचा आहे. हे मगरीचे नक्राश्रू गाळू नका, विरोधकांनो देशाची माफी मागा, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत बुधवारी मोठा गदारोळ केला. सभागृहात काचा फोडल्या. यात एक महिला कर्मचारी जखमी झाली. गैरवर्तवन करणाऱ्या खासदारांविरोधात करावाई करावी, अशी मागणी जखमी महिला कर्मचाऱ्याने लेखी स्वरुपात केली आहे. विरोधकांनी बाकांवर चढून गदारोळ केला. त्यावेळी राज्यसभेत कुठलेही विधेयक मंजुरीसाठी मांडलेले नव्हत. फक्त चर्चा सुरू होती. शांततेच आवाहन करूनही विरोधकांनी ऐकले नाही, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले. विरोधकांनी धमकीही दिली. विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती आणखी बिघडेल आणखी बिघडेल आणि भयावह होईल, असा दावा प्रल्हाद जोशींनी केला. सरकारला सात वर्षे होऊनही विरोधक जनतेचा कौल स्वीकरण्यास तयार नाही. आमची जागा होती आणि मोदींनी ती हिसकावली, असे खास करून काँग्रेसला वाटत आहे . त्यांच्या याच मनसिकतेमुळे ही अशा गोष्टी घडत आहेत, असे जोशी म्हणाले.
राज्यसभेत विरोधकांनी जे वर्तन केले त्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली. सभापतींवर विनाकारण काहीही आरोप करण्यात आले. यामुळे सभातीपदाच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला. अतिशय लाजीरवाण्या वर्तनाचे प्रदर्शन विरोधी पक्षांनी केले. विरोधकांचा हेतू स्पष्ट होता. त्यांना कामकाज शांततेत चालू द्यायचे नव्हते, असा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला.विरोध करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. पण त्यातही काही शिष्टाचार असतो. ते जे काही करत होते, ते राज्यसभा टीव्हीने जनतेला दाखवायला हवे होते . विरोधकांचे असभ्य वर्तन हे जनतेला दाखवायला हवे होते . विरोधक आता जनतेची दिशाभूल करून कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गोयल म्हणाले.