जयपूर : सातत्याने घराणेशाहीचा आरोप होणाऱ्या काँग्रेसने आता ‘एक परिवार एक तिकीट’ या फॉर्म्युल्याची घोषणा केली आहे. उदयपूरमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात हे सूत्र अमंलात आणण्याचं ठरल आहे. काँग्रेसचा हा निर्णय पंक्षांतर्गत विरोधकांना आणि घराणेशाहीची टीका करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर असल्याचं सांगितलं जातंय.
एक परिवार एक तिकीट फार्म्युला आणताना काँग्रेस सोबतच एक सोयीस्कर अपवादही आणत आहे. एखाद्या परिवारातला व्यक्ती जर राजकारणात सक्रिय होत असेल आणि त्याला तिकीट हवं असेल तर त्यानं किमान पाच वर्ष संघटनेत काम केलेलं असलं पाहिजे अशी अट असणार आहे. तसेच एक व्यक्तीला एका पदावर केवळ पाच वर्षच राहता येईल अशी सुद्धा व्यवस्था काँग्रेस करणार आहे. याशिवाय संघटनेत दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक कमिटीत किमान 50 टक्के युवक असलेच पाहिजेत हा आग्रह आहे.