सोलापूर:- रिकाम्या पोटास तृप्त करणे हे सात्विकतेचे काम आहे आणि असे सात्विक कार्य करणाऱ्या संस्थांना लायन्स सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन लायन्स क्लबने गुणवंतांचा गौरव केला आहे असे प्रतिपादन लायन्सचे प्रथम उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांनी केले. लायन्सच्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष गोविंद मंत्री यांनी स्वागत केले. लायन्स आंतरराष्ट्रीय संघटनेच्या “हंगर” (भुकेल्यांना अन्न) या प्रमुख कार्यक्रमानुसार सोलापूर शहरात अन्नदान चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बारा प्रमुख संस्थांना स्वर्गीय कांतीलाल कोठारी यांच्या स्मरणार्थ लायन्स सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करीत आहोत असे ही ते म्हणाले. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते हर्षल कोठारी व क्लबच्या सचिवा लायन नंदा लाहोटी या होत्या.
मेसाॅनिक हाॅल येथे काल सायंकाळी लायन्स ३२२४ ड १ या प्रांताचे प्रथम उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे स्वरूप असणारे हे पुरस्कार देऊन, रोटरी अन्नपूर्णा योजना, लोकमंगल अन्नपूर्णा योजना, जैन रोटी घर, मारवाडी युवा मंच, संभव फाऊंडेशन, आस्था रोटी बॅंक, राॅबिनहूड आर्मी, रोटी बॅंक, जयहिंद फूड बॅंक,सोलापूर जिला माहेश्वरी सभा, सिद्धेश्वर प्रशाला व कन्या प्रशाला माजी विद्यार्थी संघटना व प्रथम मानव सेवा या संस्थांना सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष संजय पटेल व राज मिणियार, लोकमंगलच्या वतीने अविनाश महागांवकर व शहाजी पवार व त्याप्रमाणे इतर संस्थैचे पदाधिकारी सर्वश्री भागचंद कोचर, पद्मजा भुतडा, आशिष शिरसट, नरेंद्र तलकोकुल, देविदास चेळेकर, हिंदुराव गोरे, जमीर पठाण, सतिश तमशेट्टी, जवाहर जाजू, सुहास छंचुरे यांनी आपापल्या पदाधिकारी समवेत लायन्सचे कृतज्ञता पुरस्कार स्वीकारले. राज मिणियार, अनुप्रिता अंदेली, चंद्रकांत तापडिया आदींनी लायन्स क्लबच्या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून यापुढेही सोलापूर शहरात सामूहिक रित्या कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेवटी लायन्स क्लबच्या सचिवा लायन नंदा लाहोटी यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले तर श्रीकांत सोनी व राधिका सोनी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळेस झोन चेअरमन ला. अशोक भांजे, ला गोविंद लाहोटी, अण्णासाहेब कोतली, रमेश जैन, नरेंद्र गंभिरे, दामोदर पानगांवकर, कल्पेश मालू, प्रकाश भुतडा, संतोष काबरा, अकबर मुल्ला, पद्मजाताई कुलकर्णी, सौ. सुरेखा मंत्री, अंजू मालू, सौ. रंजना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.