• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आता सतत पाच दिवस पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार !

Yes News Marathi by Yes News Marathi
April 5, 2023
in मुख्य बातमी
0
आता सतत पाच दिवस पडणारा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार !
0
SHARES
0
VIEWS

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडला तर ही नैसर्गिक आपत्ती मानली जाईल. यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. राज्य सरकारचा आतापर्यंतचा शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे.

सततचा अवकाळी पाऊस आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात आला. सलग पाच दिवस १० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय असल्याचं म्हटलं. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती ठरवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, असं ते म्हणाले. रोज पाऊस झाला आणि त्यामध्ये सातत्य असेल तर पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, असं ते म्हणाले. सध्या ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला, गारपीट झाली किंवा पाऊस झाला नाही तर मदत केली जाते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं सततचा पाऊस याचा नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतल्याचं मुनगंटीवार म्हणाले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो, असंही ते म्हणाले.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं म्हटलं. सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती ठरवण्यात येणार आहे. त्याबाबचे धोरण कसे ठरवायचे, कसे नियम ठरवायचे याबाबत चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. कमीत कमी पाच दिवस १० मिलीमीटर पाऊस झाला पाहिजे, असंही ते म्हणाले.

काही मंत्र्यांनी यासंदर्भात सूचना देखील केल्या आहेत. जर पाच दिवसांऐवजी तीन दिवसात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यास काय करण्यात येणार यासंदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात सूचना केल्या. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि विरोधी पक्षांचं मत काय आहे हे पाहावं लागेल.

Previous Post

तपास यंत्रणांच्या विरोधातील विरोधी पक्षांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Next Post

सोनालीचा ड्रेसिंग सेन्स नेहमीच आकर्षक आणि फॅशनेबल असतो

Related Posts

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते

May 25, 2026
अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
मुख्य बातमी

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

May 25, 2026
Next Post
सोनालीचा ड्रेसिंग सेन्स नेहमीच आकर्षक आणि फॅशनेबल असतो

सोनालीचा ड्रेसिंग सेन्स नेहमीच आकर्षक आणि फॅशनेबल असतो

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026