अंतरवाली सराटी : सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे. म्हणून मी सलाईन घेणं बंद केलं आहे, असा आरोप करत माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, असं खुलं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज निर्णायक बैठक घेतली आहे. यानंतर त्यांनी समाजाला संबोधित केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. एकनाथ शिंदेचे माणसे आणि अजित दादांचे देखील दोन आमदार आहेत. त्याचा काही तरी गेम करावा लागेल किंवा याचे एन्काऊंटर करावे लागेल, असे देवेंद्र फडणवीसांचे षडयंत्र आहे. तुला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
बारस्कर हा फडणवीसांनीच उभा केलाय
ते पुढे म्हणाले की, बारस्कर हा फडणवीस यांनीच उभा केलाय. मीडियावर दबाव टाकला जात आहे. हे फक्त देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे. गुलाल उधळला नाही, त्यामुळे यांचा अपमान आहे. त्याच्या डोक्यात मी ब्राम्हण त्या मराठ्यांना हरवुन दाखवू, असे आहे. ज्याचे ऐकले नाही त्याला संपवतो. देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणे काही करू शकत नाहीत. एकनाथ शिंदेला काहीच करू देत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.