सोलापूर शहरातील ठराविक चौकात दररोज वाहतुकीचे नियम मोडले जातात. कितीही दंड केला तरीही काही वाहनधारकांची मानसिकता बदलत नाही. सोलापूर शहरातील मध्यवर्ती अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून चार पुतळ्याच्या दिशेने दररोज सकाळ संध्याकाळच नव्हे तर दिवसभर दुचाकी आणि चार चाकी उलट्या दिशेने जातात. यामुळे छोटे-मोठे अपघात देखील झाले आहेत तरीही वाहनधारक बदलायला तयार नाहीत. मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहतूकचे नियम मोडतात तर त्यांच्या पाठोपाठ काही चार चाकी गाडी देखील उलट्या दिशेने घेऊन जाण्याचे अनेक जण धाडस करतात. सोलापूर शहरातील बिघडलेली वाहतूक शिस्त सुधारावी हाच ही बातमी देण्याचा उद्देश

