सोलापूर – स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा. जिल्ह्यात जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये ग्रामगीतेचे वाचन करणेचे सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. अक्कलकोट पंचायत समितीचे सभागृहात जागतिक शौचालय दिन व ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान या निमित्ताने तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उप अभियंता खैरादी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी बी एस तुळजापूरे प्रमुख उपस्थित होते.
या निमित्ताने स्वच्छता रॅलीचे आयोजन करणेत आले होते. यावेळी माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे प्रतिमेचे पूजन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे हस्ते करणेत आले. ग्रामसेवक व सरपंच यांनी पुढाकार घ्यावा. आरोग्याचे मुळ हे पाणी व स्वच्छता आहे. गावातील चांगले वातावरण राहणे साठी मनाची स्वच्छता ठेवा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये ग्रामगीतचे वाचन झालेस चांगले वातावरण राहणेस मदत झाली आहे. महिला सक्षमीकरण, गावाची स्वच्छता, गावाची एेकी असे अनेक विषय ग्रामगितेत आहेत. संत सावता माळी यांनी कामांस प्राधान्य दिले. त्या नुसार ग्रामपंचायतीचे विकासा साठी चांगले सरपंच व ग्रामसेवक यांनी गावाचे नियोजन करावे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावी पण राबवा. ग्रामगिेते मधील विचारा नुसार हे अभियान आहे.
स्वच्छतेसाठी मानसिकता बदला- सिईओ दिलीप स्वामी
तालुका स्तर व ग्रामपंचायतीचे ठिकाणी , बाजार ठिकाणे, मंदिर परिसर, सार्वजनिक ठिकाणी चांगल्या स्वच्छता सुविधा द्या. स्वच्छता व आरोग्याशी चांगला संबंध आहे.ग्रामपंचायतीचा आतील व परिसर स्वच्छ ठेवा. वृक्ष लागवड करून परिसर स्वच्छ ठेवा. हिरवागार करा. असेही आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. उप अभियंता खैरादी यांची कार्यकारी अभियंतपदी निवड झालेबद्दल सिईओ स्वामी यांचे हस्ते करणेत आला.
दोन कोटी रुपयांचे सायकल वाटप
सोलापूर जिल्ह्यातील सायकल वाचून वंचित असलेल्या मुलींना ३२०० सायकली वाटप करणेत आले आहे. आणखी ३ हजार सायकली वाटप करणेत येणार आहेत. लोकवर्गणी साठी भरभरून प्रतिसाद असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
सरपंच हा प्रशासनाचा भाग – शेळकंदे
सरपंच यांना ग्रामपातळीवर सह्याचे अधिकार आहेत. याचा वापर ग्रामविकासासाठी करणेत यावा. नुसते अभियान राबविले जाणार नाही तर यांचे मुल्यांकन केले जाणार आहे. ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियान प्रभावी पणे राबवा असे आवाहन करणेत आले. जागतिक शौचालय दिनाचे औचित्याने ग्रामपंचायत सक्षमीकरणातील स्वच्छतेचे बाबी पुर्ण करा.असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले