येस न्युज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु राजकीय पक्षातील बडे नेते आणि कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला. त्यानंतर राजकीय नाट्यावर पडदा पडला. यावेळी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यात आलं आहे. शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचं अग्रलेखातून म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली असेही सामनाच्या अग्रलेखात म्हंटले आहे.