मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्यात बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये खडाजंगी झाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणाजगजीतसिंह पाटलांमध्ये उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाब्दिक बाचाबाची झाली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमोर देखील या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती मिळाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठकीत काहीतरी संवाद सुरु असताना राणाजगजीतसिंह पाटील यांनी ओमराजेंना ‘बाळ’ असं संबोधलं. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहित आहे, जास्त बोलू नकोस, तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही’, असं म्हटलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली अन् या वादावर पडदा पडला.