• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात

Yes News Marathi by Yes News Marathi
December 4, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात
0
SHARES
1
VIEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड दिल्यामुळेच भारतीय संविधान 75 वर्षानंतरही सक्षम: डॉ. नरेंद्र जाधव

सोलापूर – राजकीय लोकशाहीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड दिल्यामुळेच भारतीय राज्यघटना आज 75 वर्षानंतरही सक्षम असल्याचे प्रतिपादन माजी खासदार, प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुल, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘कोट्यावधी मनाला स्पर्श करणारे मन: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे जागतिक संदर्भ’ या महत्त्वपूर्ण विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी डॉ. नरेंद्र जाधव बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, जगात दुसर्‍या महायुध्दानंतर स्वतंत्र झालेल्या राष्ट्राच्या राज्यघटनांचे आयुर्मान हे सरासरी 17 वर्षे एवढेच आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची जोड देवून एक व्यक्ती, एक मतदान अधिकार बहाल केल्यानेच भारतीय राज्यघटना 145 कोटी लोकसंखेला बांधुन ठेवणारी व 75 वर्षानंतरही सक्षम असल्याचे दिसुन येते. नवीन भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयावर लेखन केले आहे. जातीव्यवस्थेमुळेच आर्थिक विकासाला खिळ बसते. स्वातंत्र्य, सामाजिक समता आणि संधीची समानता जेथे नसते, तेथे आर्थिक विकास होत नाही. म्हणुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत सर्वसामान्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करुन दिली असल्याचेही डॉ. नरेंद्र जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे समानता, ज्ञान, सेवाभाव आणि प्रगती या मुलभूत तत्वावर पुढे जात असल्याचे स्पष्ट केले. राजाभाऊ सरवदे यांनी अध्यासन केंद्राबद्दल विस्तृत माहिती दिली. यावेळी त्यांनी प्रस्तावित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राबद्दल देखील माहिती सांगितली.

दुसर्‍या सत्रात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी विचार’ या विषयावर डॉ. विजय खरे मांडणी केली. भारताचे परराष्ट्र धोरण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलभूत विचारावर आधारलेले आहे. त्याच विचारावर भारत आजही जगात वाटचाल करत असताना मानवतावाद डोळ्यासमोर परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करत असल्याचे नमुद केले. यावेळी 150 संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लिहलेल्या संशोधन पेपरचे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या दोन व्हॉल्युमचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एच.ए.शेख यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्वीनी कांबळे यांनी केले. तर आभार प्रा. सागर राठोड यांनी मानले. आंतरराष्ट्रीय परिषदेला विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Previous Post

सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, सोलापूर महापालिकेचा मुद्दा गाजणार

Next Post

सोलापुरातील सीएनजी ‘गॅसवर’

Related Posts

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!
मुख्य बातमी

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’
मुख्य बातमी

मक्याने साखरेला टाकले मागे! इथेनॉल निर्मितीत मका ठरली ‘किंग’

August 30, 2026
कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
Next Post
सोलापुरातील सीएनजी ‘गॅसवर’

सोलापुरातील सीएनजी 'गॅसवर'

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026