• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अजित पवारांना सोलापुरात जोरदार झटका ; प्र. क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केला भाजपमध्ये प्रवेश

by Yes News Marathi
January 12, 2026
in मुख्य बातमी
0
अजित पवारांना सोलापुरात जोरदार झटका ; प्र. क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केला भाजपमध्ये प्रवेश
0
SHARES
475
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महापालिका निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील एका अधिकृत उमेदवाराने आज अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे शहरातील एका प्रभागातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी आज सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. सोलापूर महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पक्ष सोडल्यामुळे पक्षाच्या निवडणूक रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

भाजप, राष्ट्रवादी व ठाकरे गटात होती तिरंगी लढत

प्रभाग क्रमांक 9 ड मध्ये यापूर्वी भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादीचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत होती. राष्ट्रवादीकडून जक्का यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानाच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून पक्षाच्या प्रचारयंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. या पक्षांतरामुळे भाजपला मात्र मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले उमेदवार भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या ठाकरे गटापुढेही नव्या आव्हानांची निर्मिती झाली आहे.

सोलापूरच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा

सोलापूर महापालिकेची निवडणूक सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे भाजपमध्ये काही ठिकाणी अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे सूर उमटताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतही जागावाटपावरून मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोर उमेदवार मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांत सकाळी एका पक्षात असलेले इच्छुक उमेदवार सायंकाळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र सोलापुरात वारंवार पाहायला मिळाले. या सततच्या राजकीय उलथापालथींमुळे सामान्य मतदार मात्र गोंधळून गेला आहे. कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या 102 जागांसाठी निवडणूक

102 सदस्यीय सोलापूर महापालिकेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने 49 जागा जिंकत सर्वाधिक यश मिळवले होते. त्यानंतर शिवसेनेला 21, काँग्रेसला 11, एमआयएमला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4, बसपला 4 आणि माकपला 1 जागा मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र स्थानिक समीकरणे, पक्षांतर्गत बंडखोरी, ऐनवेळी होणारे पक्षांतर आणि मतदारांचा बदलता कल यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या भाजप प्रवेशामुळे अजित पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, सोलापूर महापालिकेचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा संपन्न

Next Post

समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय …सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत

Next Post
समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय …सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत

समृद्धी करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता तर महाडचा अमोल गोळे द्वितीय ...सुहास आदमाने व डॉ. ऋचा गोडगे समृद्धी युवा पुरस्काराने सन्मानीत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In