पत्नी सोडून गेल्यामुळे खांबावर चिडलेल्या दुःखी व्यक्तीने शोले मधील एका प्रसंगाची आठवण ताजी करून दिली . 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले मध्ये वीरू बसंती बरोबर विवाह करण्याच्या जिद्दीने पाण्याच्या टाकीवर चढतो .या ठिकाणी पतीने पाण्याच्या टाकी ऐवजी विजेच्या खांबावर चढण्याचा निर्णय घेतला.
त्याची पत्नी काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. त्यामुळे दुःखी झालेल्या या पतीने हे पाऊल उचलले . छत्तीसगडमधील बलरामपुर येथील हा प्रकार अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आला. गावकऱ्यांनी या दुःखी पतीला खांबावरून उतरवण्यासाठी खूप वेळ पर्यंत समजूत घातली .परंतु अखेर त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हा पती खाली उतरला. पोलिसांच्या माहितीनुसार या व्यक्तीने दारू घेतली होती. दारूच्या नशेत तो विजेच्या खांबावर चढला होता . पोलिसांनी त्याला खाली उतरवून पोलीस चौकीत नेईपर्यंत त्याची नशा पूर्णपणे उतरली होती. अखेर पोलिसांनी समजूत घालून त्याला घरी पाठवले.