• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय मोदींना : मुकेश अंबानी

by Yes News Marathi
December 15, 2020
in मुख्य बातमी
0
भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय मोदींना : मुकेश अंबानी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी फ्युएल फॉर इंडिया २०२० या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भारतीतल डिजिटल मंचांच्या प्रगतीवर चर्चा केली. या वेळी मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमाला संबोधितही केलं. भारतातील अनेक कंपन्या आणि संघटना डिजिटल इनक्युजनवर त्वरित काम करत असल्याचं ते म्हणाले. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये भारतातील युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. तसंच भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या मोहिमेला दिलं. तसंच यावेळी त्यांनी भारताच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या परदेशी गुंतवणुकीसाठी मार्क झुकरबर्ग यांचे आभारही मानले. “सध्या देशात डिजिटल क्रांतीच्या शक्यतांवर व्यापक प्रमाणात चर्चा होत आहेत. संकटाच्या काळातच नव्या शक्यतांच्या रस्ता आपल्याला दिसतो. देशात करोनाच्या संकटामुळे नव्या शक्यतांचा मार्ग उघडला आहे,” असंही अंबानी म्हणाले.

करोना महासाथीच्या संकटात देशात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक झाली आहे. फेसबुकची जिओमधील गुंतवणूक ही भारतातील सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. फेसबुक आणि जिओ एकत्र येऊन पुढील कालावधीत छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणार आहेत. छोट्या व्यवसायांसाठी व्हॅल्यू क्रिएशन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. “सध्या देशात वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम या योजना यशस्वी होताना दिसत आहेत. देशातील विकास यापुढेही कायम राहणार आहे,” असंही अंबानी म्हणाले.

Previous Post

‘या प्रसंगामुळं मला माझ्या मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले’ – दत्तात्रय भरणे

Next Post

सोलापूरकर त्रस्त : रस्त्यावर पाणी अन् हवेत धूळ….

Next Post
सोलापूरकर त्रस्त : रस्त्यावर पाणी अन् हवेत धूळ….

सोलापूरकर त्रस्त : रस्त्यावर पाणी अन् हवेत धूळ….

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group