चाकण परिसरातील रस्त्यांची झालेली चाळण ,सततची वाहतूक कोंडी ,कचऱ्याचे ढीग आणि अनेक ठिकाणी साचलेले पाणी या समस्यांना कंटाळून 20 कंपन्यानी स्थलांतर करण्याचा इशारा दिला असताना ,चाकण मध्ये सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील एमएसएमई 49 कंपन्यांसह 2 हजार 320 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यास राज्य सरकारला यश मिळाले आहे .ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे जिल्ह्यातून ‘औद्योगिक नगरी’ संकल्पनेची सुरुवात केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जाहीर करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी गुंतवणुकी संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. यानिमित्त सह्याद्री अतिगृहात झालेल्या कार्यक्रमात फडणवीस म्हणाले, प्रस्तावित गुंतवणुकीमुळे उत्पादनक्षमता वाढवण्याबरोबरच हजारो नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पुणे परिसरातील वाहन आणि अभियांत्रिकी उद्योगांच्या परिसंस्थेत एम एस एम ई उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे.अनेक उद्योग आवश्यक घटक आणि सेवांची स्थानिक एमएससी ई कडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. अनेक उत्पादनांच्या आयातीला पर्याय निर्माण करून ‘लोकल टू ग्लोबल’ वाटचालीला चालना देण्याचे काम एमएसएम ई क्षेत्र करत आहे .या सामंजस्य कराराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला .तसेच नियोजनबद्ध वेगवान विकासासाठी राज्य शासनाने स्वतंत्र्य व्यवस्था उभारली आहे.शिवाय ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातील औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.











