• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2026
in इतर घडामोडी
0
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात अमृत सरोवरांची एकूण 139 कामे पूर्ण

"पाणी हे जीवनाचे मूळ आहे. पण आज जगभरात पाण्याची टंचाई ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. महाराष्ट्रातही पावसाचे अनियमितपणा, भूजलाचा अति उपसा आणि प्रदूषणामुळे पाणी संकट गडद होत आहे. अशा परिस्थितीत "जलसंधारण अभियान" हा केवळ सरकारी उपक्रम नसून, प्रत्येक नागरिकाच्या जगण्याशी निगडीत चळवळ आहे."

15 ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान संपूर्ण राज्यात जलसंधारण सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहाचे ब्रीदवाक्यच आहे – “माती वाचवा, पाणी वाचवा… भविष्य सुरक्षित करा.” असे आहे. तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवले जात आहे.

सोलापूरची यशोगाथा : अमृत सरोवर अभियान 100% पूर्ण
जलसंधारणाच्या दिशेने सोलापूर जिल्ह्याने देशाला आदर्श घालून दिला आहे. केंद्र सरकारच्या अमृत सरोवर अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्याला 75 सरोवरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या नियोजन आणि लोकसहभागातून हे उद्दिष्ट मागे टाकून एकूण 139 अमृत सरोवरांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण(NHAI) सोलापूर व पंढरपूर विभाग, जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय, लघु पाटबंधारे Z.P. विभाग आणि मृद व जलसंधारण विभाग या चारही विभागांनी ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली.

या अभियानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाणीसाठ्यात झालेली वाढ. NHAI च्या 70 कामांमधून 6200.32 घनमीटर, लघु पाटबंधारे च्या 39 कामांमधून 4666.09 घनमीटर आणि जलसंधारण विभागाच्या 30 कामांमधून 420.24 घनमीटर असे एकूण 11,286 घनमीटरहून अधिक पाणीसाठा पुनर्स्थापित होणार आहे.

तलावांमधील गाळ काढून तो रस्ते बांधणीसाठी वापरण्यात आल्याने दुहेरी फायदा झाला आहे. एकीकडे तलावाची साठवण क्षमता वाढली, तर दुसरीकडे रस्ते मजबूत झाले. प्रत्येक सरोवरासाठी पंचायत स्तरावरील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि यूजर ग्रुप नेमण्यात आले असून, कामांची तपासणी करून अहवाल व फोटो पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.

जलसंधारण का अपरिहार्य आहे?

  1. भूजल पातळीचे रक्षण: पावसाचे पाणी जमिनीत मुरवले तरच विहिरी-बोअरला पाणी टिकते. एक थेंब साठवला तर दहा थेंब भूजल वाढते.
  2. शेतीला आधार: बंधारे, शेततळी, नाला खोलीकरणामुळे खरीप-रब्बी दोन्ही हंगामात पाणी उपलब्ध होते. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते.
  3. दुष्काळावर मात: साठवले पाणी उन्हाळ्यात गावाला आणि पशुधनाला उपयोगी पडते.
  4. पर्यावरण समतोल: पाणी असेल तर झाडे जगतात, पक्षी येतात आणि जैवविविधता टिकते.

जलसंधारण सप्ताहातील उपक्रम
या सप्ताहात जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

MahaWalkathon – Walk for Water : 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता होम ग्राऊंड, सोलापूर येथून भव्य पदयात्रेला सुरुवात होणार आहे. डफरीन चौक, महात्मा गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रंगभवन असा या पदयात्रेचा मार्ग आहे. यात शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

Reels स्पर्धा: माती व पाणी संवर्धन या विषयावर तरुणांसाठी रील्स स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय 15,000 आणि तृतीय 10,000 रुपये इतके बक्षीस ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन झाले. नोंदणीसाठी http://register.mahaevent.co.in ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आपली जबाबदारी काय?
मोठे प्रकल्प सरकार करते, पण खरे जलसंधारण घरापासून सुरू होते. प्रत्येक नागरिकांनी पाणी बचत करणे ही काळाची गरज आहे. नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा. ब्रश करताना, भांडी धुताना नळ बंद ठेवा. घराच्या गच्चीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. अंगणात, शेताच्या बांधावर झाडे लावा. शेतात सेंद्रिय शेती आणि ठिबक सिंचनाचा वापर करा.

जिल्हा न्यायालयात नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, “रक्तदान हे जीवनाला नवसंजीवनी देणारे कार्य आहे.” अगदी तसेच जलसंधारणही आहे. आज आपण वाचवलेला प्रत्येक लिटर पाणी हे उद्याच्या पिढीसाठी अमृत आहे.

पाणी हे विकत घेता येत नाही, ते फक्त जपता येते, संवर्धन करता येते. सोलापूर जिल्ह्याने अमृत सरोवरांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे की इच्छाशक्ती असेल तर अशक्य ते शक्य होते. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जलसंधारण अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा व अमृत सरोवर मध्ये प्रशासन व लोकसहभागातून उद्दिष्टापेक्षा मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी प्रयत्न करावेत. व जिल्ह्यात जलसंवर्धनाची चळवळ निर्माण करावी.

Previous Post

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

Next Post

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यात ऊस शेती संकटात; उत्पादन निम्म्याहून अधिक घटण्याची शक्यता

August 19, 2026
Next Post
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026